Thursday, April 23, 2015

Environmental Engineering – Challenges and Opportunities



Environmental Challenges

India is facing new challenges of environmental pollution from local to national scale and  increased social resistance to industrial and urban development projects due to fear of further degradation of environmental quality. People have lost the confidence in environmental engineering capabilities in ensuring sustainable development. On the other hand,  recent advances in  environmental technology and management systems have evolved effective solutions to prevent    environmental pollution.  The task before present environmental engineers is to regain the confidence of people by providing efficient, economical and dependable environmental management systems.

Critical appraisal of environmental status in India

If we examine the present status of environmental quality in India, we find that there are  no satisfactory sewage  collection and treatment plants and hygienic solid waste disposal facilities for cities, improper treatment of industrial wastes and no control of air pollution due to industrial stack emissions and vehicular traffic. As a result, soil, water and air are getting polluted. Most of our rivers are grossly polluted and have adverse impact on agriculture and  water supply systems.  

The situation is worsening due to increase in urbanization with rampant growth of slums and multistoried buildings in and around cities. This is creating unsustainable load on existing civil service facilities like water supply, wastewater and sold waste collection systems, traffic problems and vehicular pollution.
Industries consider investment for pollution control and non productive expenditure and generally try to economize on treatment plant  and ignore proper operation.

 Agro-based industries like sugar, distillery, textile and paper mills  discharge  their partially treated wastewaters on land for irrigation. However, in absence of enough dilution with irrigation water, such wastes spoil soil quality and agricultural return water adds pollution to rivers.

Engineering and chemical industries produce hazardous  solid and liquid wastes and need specific treatment before disposal which is found to be highly inadequate.

 All industries are trying to expand their production capacities but fall short in  upgrading treatment facilities accordingly.

 Unfortunately the government agencies for Prevention and Control  of pollution have shortage of skilled manpower, resources for proper monitoring and insufficient legal tools for effective control.  Many a times, it is not possible to stop pollution by closing industries or force local bodies due to financial and technical constraints. As a result, they cannot exercise their assigned role effectively.

As such the situation has already reached an alarming level and proposed industrial corridors and smart cities may add up environmental degradation, if proper and effective measures are not taken.

Design of adequate and efficient waste treatment facilities and their proper operation and maintenance are essential to rectify this situation. There are two main constraints in implementation of these schemes. First is the unavailability of necessary finance and second is lack of comprehensive environmental restoration plan which needs collaborative efforts by administrators, environmental engineers and financial institutions.  

Role of environmental engineers 

The role of environmental engineers is to evolve most appropriate and innovative technology options and  design a system which is techno-economically feasible and provide detailed guidelines  for strict control and monitoring of the projects during construction as well as operation.

 This requires initiative and efforts by environmental engineers and technocrats to  assist sustainable development and lays great responsibility of providing need based, fail safe and economical solutions for environmental protection. 

These challenges also could be looked upon as great opportunities for career development and a big boost to research in environmental technology.

   
       

Tuesday, April 21, 2015

Back to Square One


Today is Akshay Tritiya. On this auspicious day I am happy to announce that I have changed my focus of study and future field of interest. After working for fifteen long years in the fascinating IT field, I am returning to my home ground of Environmental Engineering. This change in my mindset gives me pleasure of regaining new strength and aspirations.

Towards the fag end of my service in Walchand College of Engineering in Civil Department as professor of Environmental engineering, I ventured to enter the fast growing IT entrepreneurship by establishing Dnyandeep Infotech Pvt. Ltd.  Though I had  some experience of participating in software development and teaching of computer programming, staring a private limited company was a risky step. With  few fresh computer graduates we started working.

The main driving force behind my initiative was to create awareness about future potential of IT and develop software in local language Marathi. Soon we could establish ourselves as leading web design and software company in Sangli. We developed some city portals, educational and social websites which became very popular. However, as the internet connectivity was poor and computers were considered as luxury rather than necessity, there was no financial stability to our company. The frequent outflow of our experienced software professionals to corporate IT companies, the status of company got transformed to informal training institute.

With the new wave of green technology in real estate sector and need of creating environmental awareness, I thought it fit to start public trust for education and research in Environment and IT. This gave birth to Dnyandeep Education & Research Foundation in 2005. We conducted many seminars and workshops and international study tours through this foundation.

Though I was active in these two organizations, I was always tagged as professor of environmental engineering by all. This was the result of my qualification and main service career. People were not ready to accept me as a web designer or software professional. This created a sense of disappointment in my mind. Nevertheless, I continued to delve in many new advances in IT field and took keen interest in development efforts taken by our software personnel.

I was fortunate to get ample field experience in design and planning of water supply and wastewater projects and conducting Environmental Impact studies for many industries while working in college. Dr. Subbarao was instrumental in creating an atmosphere of applied research and development in Environmental Engg  and established consultancy links with industries and local bodies. Dr. Subbarao, myself and Prof. Gadgil formed a unique team in the college,  which provided necessary technical advice to many local bodies and industries for over three decades.. We could get help from our post graduate students.

 I had opportunity to visit many industries in Maharashtra, Andhra Pradesh and Karnataka states and I could get much broader knowledge of environmental pollution problem and reasons for failure in implementing effective technical solutions. Social apathy towards environmental issues and tendency of ignoring the problem on economic grounds were the main reasons for such failure. Probably, this discouraging experience led me to turn my attention from environmental  to newly emerging IT field.

With the onset of new government under the dynamic and visionary leadership of  Prime Minister Modi, both IT and Environmental Fields are given top priority in planning and fund allocation.  Development of effective and economical solutions to many large scale environmental pollution problems has become a daunting task for the experts in the field. Great new opportunities are opened in Environmental consultancy. Unfortunately, at present,  it is observed that  majority of environmental  fresh graduates in India   lack field experience and are ill equipped with latest design techniques. As a result, there is a shortage of capable  environmental  engineering firms in India.  As a consequence, it is possible that   foreign companies with latest technologies will be  awarded planning and execution of environmental  projects in India.

I felt that it is more important for me to use my knowledge and expertise in Environmental Engineering in a more proactive and direct way rather than spending time in steering research in Information technology, the field which is already flooded with many talented young professionals.

Considering my age, it was not possible for me to start such a venture on individual basis. Hence I decided to form a like minded group for this task. Fortunately for me, I could get positive response from Dr. A. B. Kulkarni, a senior structural engineer, Shri. Deshmane, Retd Chief Engineer from M.J.P and my longtime colleague Prof. Gadgil.  We formally started a partnership firm under the name of  `Enviro Tech-Square’ on Gudhi Padwa.

I look forward to my future career in this familiar field and have started refreshing my experience and and relearning new developments in this field with great enthusiasm and vigor of a child entering new school.



Sunday, April 19, 2015

रस्त्यांचे रजिस्टर

रस्त्यांचे रजिस्टर ठेवून त्यात दुरुस्तीविषयी माहिती नोंदण्याची सूचना सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या मा. महापौरांनी केल्याचे वाचनात आले. त्यांच्या या उपयुक्त सूचनेबद्दल त्यांचे अभिनंदन. खरे पाहता, रस्ते, पाण्याचे नळ, कचराकुंड्या, विजेचे खांब अशा सर्व गोष्टींची नोंद असणे आवश्यक आहे.

उदाहरणच द्यायचे झाले तर शहरातील प्रत्येक रस्त्याची माहिती म्हणजे तो तयार केव्हा केला, दुरुस्ती केव्हा केली, ट्रॅफिक किती आहे, अपघात किती झाले यांच्या माहितीचा आढावा घेतल्यास रस्त्याच्या आरोग्याविषयी आपल्याला अंदाज बांधता येईल. हा अंदाज इशारा स्वरुपात संगणकावर दिसू शकण्याची योजना करता येईल म्हणजे रस्ता धोकादायक बनला आहे व तो लगेच दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे हे त्या रस्त्याची माहितीच आपल्याला सांगू शकेल. मग लोकांच्या तक्रारीची वाट न बघता त्यावर वेळीच उपाय योजना करता येईल.

सध्या अशा निर्जीव सेवासुविधांविषयीच्या तक्रार लोक व नगरसेवक संबंधित खात्याकडे करतात. यात जो तक्रार करील वा ज्या नगरसेवकाचा दरारा मोठा त्याच रस्त्याचे भाग्य उजळते. आवश्यकता नसली तरी अशा रस्त्यांचे नूतनीकरण होते. इतर रस्त्यांची स्थिती अगदी खालावलेली असली तरी प्रभावी तक्रारीअभावी त्यांची कोणी दखल घेत नाही. परिणामी एखादा मोठा अपघात सगळ्यांचे त्याच्याकडे लक्ष वेधतो. पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. घडायचे ते घडून गेलेले असते.

जी गोष्ट रस्त्याची तीच प्रत्येक नागरिक सुविधेची, प्रदूषणाची, धोकादायक परिस्थितीची. या सर्वांची कालबद्धमाहिती  आधुनिक उपकरणांच्या व सर्वंकष माहिती व्यवस्थापनाच्या आधारे स्वयंचलित पद्धतीने नोंद करण्याची यंत्रणा विकसित केली व धोकादर्शक स्थितीबद्दल अलर्ट सिग्नल मिळण्याची व्यवस्था केली तर अपघात टळतील, प्रदूषण वाढणार नाही व शहरातील सर्व सेवासुविधा विनातक्रार काम करतील. सर्वांचा विकास लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाशिवाय केवळ गरज व गुणवत्ता यांच्या आधारे करणे शक्य होईल.

सध्याच्या इ-गव्हर्नन्सच्या युगात अशी नोंद कॉम्युटरवर करणे सहज शक्य आहे.  महापालिकेच्या वेबसाईटवर अशी माहिती नागरिकांना पाहण्यास उपलब्ध केली व त्यांच्या सूचना वा तक्रारी नोंदण्याची व्यवस्थाही वेबसाईटवर उपलब्ध करून दिल्यास महापालिकेच्या प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल व नागरिकांच्या तक्रारींनाही त्वरित योग्य न्याय मिळेल. मा. महापौरांनी याबाबतीत पुढाकार घेतल्यास सांमिकु महापालिका महाराष्ट्रात आदर्श ठरेल. भावी स्मार्ट सिटीच्या योजनेसाठीही ही एक चांगली  सुरुवात ठरेल.

Friday, April 17, 2015

शोध बालसंशोधकांचा

 ३ एप्रिल २०१५. सारे जग ‘गुड फ्रायडे’ साजरा करीत होते. ज्ञानदीपच्या कारकिर्दीतही या दिवशी एक सुखद चमत्कार घडला. पुण्यातील पर्सिस्टन्स सिस्टीम्स या नामांकित आय़. टी. कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट डॉ. अभय जेरे यांनी ज्ञानदीप ऑफिसला भेट दिली.

 कारणही तसेच नाविन्यपूर्ण होते. सांगली जिल्ह्यातील बालसंशोधकांचा शोध घेण्याचा एक प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने प्राथमिक तयारी करणे हा त्यांचा या भेटीमागे उद्देश होता.  पूर्वी विलिंग्डन कॉलेजमध्ये व आता पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये भौतिक शास्त्राचे प्राध्यापक असणारे प्रा. एस. जी कुलकर्णी यांनी या बाबतीत पुढाकार घेतला होता. सांगलीत मराठी विज्ञान प्रबोधिनीचे कार्य त्यांना ठाऊक होते. या संस्थेचे कार्यवाह व आमच्या ज्ञानदीप फौंडेशनचे कार्यकर्ते श्री. अरविंद यादव, विलिंग्डन कॉलेजचे डॉ. उदय नाईक यांच्याबरोबर डॉ. अभय जेरे आमच्या घरी आले. राष्ट्रीय स्तरावर विज्ञानसंशोधनाच्या क्षेत्रात भारत सरकार करीत असलेल्या अनेक उपक्रमांमध्ये  सहभागी असणार्‍या डॉ. जेरे यांनी या प्रकल्पामागची पार्श्वभूमी सांगितली.

शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांमधील विज्ञान जिज्ञासा वाढावी तसेच नाविन्यपूर्ण संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांच्या कार्यास प्रोत्साहन द्यावे या उद्देशाने  २०१३ साली गोव्यामध्ये पर्सिस्टन्स सिस्टीम्सने असा प्रकल्प पूर्ण  केला होता व नवसंशोधक शालेय विद्यार्थ्यांनी बनविलेल्या निवडक प्रतिकृतींचे प्रदर्शन पुण्यात भरविले. यास प्रचंड प्रतिसाद मिळाला.  हे प्रदर्शन पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून लाखो विद्यार्थी आले. हा अनुभव उत्साहवर्धक होता.

 महाराष्ट्रातही असा प्रकल्प राबविण्याची कल्पना यातून जन्मास आली. अर्थात गोव्याच्या मानाने महाराष्ट्राचे आकारमान व लोकसंख्या अतिशय मोठी असल्याने सर्व जिल्ह्यातील सर्व शाळांपर्यंत पोचून तेथील बालसंशोधकांचा शोध घेण्यासाठी मोठी प्रसार यंत्रणा व कार्यपद्धती विकसित करण्याची  गरज आहे. त्याची पूर्व तयारी म्हणून सांगली जिल्ह्यासाठी पथदर्शक प्रकल्प डिसेंबर २०१५ पर्यंत पूर्ण करण्याचे पर्सिस्टन्स सिस्टीम्सने ठरविले. विज्ञानभारती या संस्थेच्या माध्यमातून  हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

सांगलीत विज्ञानप्रसाराचे कार्य मराठी विज्ञान प्रबोधिनी ही संस्था १९८१ पासून करीत आहे. विविध क्षेत्रातील विज्ञान तज्ज्ञ, वैद्यकीय व इंजिनिअरिंग व्यवसायातील अधिकारी व्यक्ती  तसेच शाळांतील विज्ञान शिक्षक यांच्या एकत्रित प्रयत्नातून या कार्यास चांगली गती आली आहे. गेल्या वर्षी श्री अरविंद यादव यांचा उत्कृष्ट विज्ञान प्रसारक म्हणून मराठी विज्ञान परिषदेमार्फत गौरव करण्यात आला. साहजिकच या संस्थेचे सहकार्य घेतल्यास प्रकल्प यशस्वी होण्यास मदत होईल.

 मराठी विज्ञान प्रबोधिनीच्या विज्ञान प्रसाराच्या कार्यास मदत म्हणून ज्ञानदीप फौंडेशनने २००५ मध्ये  विज्ञानविषयक वेबसाईट (www.vidnyan.net) कार्यान्वित केली. मिरज विद्यामंदिर या शाळेतील ज्येष्ठ विज्ञानशिक्षक श्री. गो. पां. कंटक यांचे हस्ते या वेबसाईटचे उद्‌घाटन करण्यात आले.

मराठी माध्यमाच्या शाळेतील  विद्यार्थी तसेच सर्वसामान्य मराठी जनतेस जगातील विज्ञान संशोधनाची ओळख व्हावी तसेच मुलांमध्ये विज्ञान जिज्ञासा वाढावी या हेतूने अनेक लेख , विज्ञान प्रयोग व चलचित्रे यांचा समावेश या वेबसाईटवर करण्यात आला आहे. वेबसाईटबरोबरच सध्याचे आधुनिक माध्यम मोबाईल यावर पाहता येणारी विज्ञानविषयक अँड्रॉईड ऎपही ज्ञानदीपने विकसित केली आहेत.

पर्सिस्टन्स सिस्टीम्सच्या  महत्वाकांक्षी प्रकल्पात ज्ञानदीप फौंडेशन आपले सक्रीय योगदान देणार आहे.

त्यादिवशी दुपारी डॉ. जेरे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मॅनेजमेंट कॉलेजमध्ये सर्व कार्यकर्त्यांची सभा घेतली व या प्रकल्पाची रूपरेषा सांगितली. सांगली जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये जाऊन तेथील  विद्यार्थ्यांना या प्रकल्पाची माहिती देणे, त्यांना संशोधनासाठी  योग्य ते मार्गदर्शन करणे यासाठी  अनेक विज्ञानप्रेमी स्वयंसेवकांचे सहकार्य लागणार आहे असे आवर्जून सांगितलॆ.

 प्रकल्पाच्या  सुयोग्य कार्यवाहीसाठी  www.i4c.co.in ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. त्यावर इच्छुक विज्ञानप्रेमी स्वयंसेवकांनी आपली नावे नोंदवावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

 बालसंशोधकांचा शोध ही कल्पनाच नाविन्यपूर्ण आहे. मी इंटरनेटवर याचा शोध घेतला तेव्हा मला कळले की भारत सरकारतर्फे माजी राष्ट्रपती व जागतिक संशोधक डॉ. अब्दुल कलाम आझाद यांच्या पुढाकाराने  ‘इग्नाईट अवार्ड’ या नावाने असे कार्य २००८ पासून चालू आहे. अमेरिकेतही अशा स्पर्धा गेली अनेक वर्षे घेतल्या जातात.

 यासंबंधीची सर्व माहिती तसेच त्यांनी प्रसिद्ध केलेली पुस्तके विज्ञान डॉट नेट या वेबसाईटवर ‘बालसंशोधक’ या विभागात देऊन ज्ञानदीपने आपले या प्रकल्पातील सहकार्य सुरू केले आहे.


मला वाटते की बालसंशोधकांचा शोध घेण्यापेक्षा बालसंशोधक  निर्माण कसे होतील यासाठी प्रयत्न व्हावयास हवेत. परदेशात ‘चेरी पिकींग’ या कार्यक्रमात अनेक लोक उत्साहाने सहभागी होतात. चेरीची बाग फुलविणार्‍या शेतकर्‍याला मात्र सर्व जण विसरतात. तसेच काहीसे येथे होताना दिसते. बालसंशोधकांना शोधून बक्षिसे देणे आवश्यक आहेच मात्र त्यापेक्षाही जास्त महत्वाचे म्हणजे मुलांमध्ये वैज्ञानिक वृत्ती व जिज्ञासा कशी वाढेल यासाठी प्रयत्न करण्याची,  त्यांना आवश्यक ती सर्व साधनसामुग्री पुरविणे व जिज्ञासापूर्तीसाठी लागणारी ज्ञानसंपदा त्यांना सहजी उपलब्ध करून देण्याची खरी गरज आहे. यासाठी पैसेच लागतात असे नाही तर प्रौढांनी आपला वेळ मुलांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी व मुलांसाठी सोपे वैज्ञानिक साहित्य निर्माण करण्यासाठी पुरेसा वेळ काढावयास हवा.    

Wednesday, April 15, 2015

संदेशवहन व संपर्कासाठीची आधुनिक प्रसारमाध्यमे

( सांगली बँकेच्या निवृत्त कर्मचार्‍यांच्या वार्षिक मेळाव्यात केलेल्या भाषणाचा सारांश)

माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीने जीवनाच्या सर्व क्षेत्रात क्रांतीकारक बदल घडवले आहेत. घराघरात दूरदर्शन आला असला तरी त्यापेक्षा प्रभावी व अत्यंत कमी खर्चाचा व कोठेही उपलब्ध होणारा पर्याय संगणक व मोबाईल यांच्या माध्यमातून इंटरनॆटनॆ उपलब्ध करून दिला आहे.

इ मेल :- पोस्टाने लिखित स्वरुपात पत्र पाठविण्याऎवजी इंटरनेटच्या माध्यमातून इ मेल द्वारे आपल्याला कोणासही कोठेही विनाखर्च संदेश पाठविता येतो. सुरुवातीच्या  इ मेलमध्ये फक्त शाब्दिक मजकूर पाठविण्याची सोय होती. आता मात्र इ मेलचा वापर करून आपल्याला शाब्दिक मजकुराशिवाय चित्रे, फोटो तसेच ध्वनी व चित्रफितीही पाठविता य्रेतात. इ मेलमध्ये आपले खाते सुरु करताना आपल्याला आपला इमेल पत्ता व गुप्ततेसाठी एक पासवर्ड ( एक सांकेतिक शब्द ) वापरावा लागतो.  असल्याने तो कोठेही असला व त्याने कोणत्याही संगणकावर काम सुरू केले की इंटरनेटव्दारा त्याचा शोध घेतला जाऊन त्याला तो निरोप पोहोचू शकतो.

जगभर असणारी व विखुरलेली माहिती व बुध्दीमत्ता यांचे अतिवेगात दळणवळण झाले तर प्रगतीचा वेग कितीतरी पटीने वाढू शकेल. इंटरनेटच्या वापरामुळे बुध्दीमान व्यक्तीना आता प्रगत राष्ट्रांत न जाता तेथील प्रगतीचा उपयोग करणे शक्य झाले आहे. व्यापाराच्या दृष्टीने इंटरनेटमुळे दुहेरी परिणाम होणार आहे. जागतिक व्यापरपेठ इंटरनेटमुले खुली झाल्याने आपला माल सर्व जगभर पाठविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी स्थानिक उद्योजकांना बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागल्याने ते अडचणीत येऊ शकतील. पर्यावरण क्षेत्रामध्ये इंटरनेट फार उपयुक्त ठरणार आहे. नवनवी घातक द्रव्ये, त्याचा वापर, पर्यावरणाचे संरक्षणाचे उपाय याविषयी त्वरीत माहिती मिळण्याची शक्यता इंटरनेटने निर्माण केली आहे.

थोडक्यात इंटरनेट रूपाने मानवाने प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकले असून ते उज्वल भविष्याकडे नेईल अशी आशा आहे. इंटरनेटचा एक दोष म्हणजे त्यात माहितीचा असणारा न पेलवणारा साठा. माहितीच्या समुद्रातून आपल्याला हवी ती माहिती मिळविणे ही एक मोठी मुश्किल गोष्ट आहे. अर्थात यासाठी विविध प्रकारचे शोधक प्रोग्रॅम (सर्च इंजिन) बनविण्यात आले असून त्यांच्या साहाय्याने आवश्यक त्या माहितीचा शोध घेता येऊ शकतो.

आज भारतात मोबाईल हे संदेश वहनाचे सर्वात प्रभावी व लोकप्रिय माध्यम बनले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत व गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, सर्वजण आपल्या दैनंदिन कामासाठी याचा वापर करीत आहेत. यामुळे प्रत्यक्ष भेटण्यासाठी लागणारा प्रवास, वेळ व पैसा यात बचत होऊन कार्यक्षमतेत वाढ झाली आहे. 
मोबाईलच्या माध्यमातून आज आपल्याला इंटरनेटच्या सर्व सुविधा वापरता येतात. संदेश पाठविण्यासाठी इ मेल, फेसबुक, ट्वीटर, व्हाट्सएऍप यांचा वापर करता येतो. मोबाईलवरून आपण कोणासही व कोठेही संपर्क करू शकतो. इंटरनेटवरील स्काईपसारख्या सुविधा वापरून जगात कोठेही असणार्‍या आपल्या मित्राशी वा नातेवाईकाशी दृश्य स्वरुपात भेटू शकतो. थ्री डी तंत्रज्ञानाने आता अशा सर्व संपर्क सुविधात अधिक जिवंतपणा येऊ लागला आहे. गुगलने आपल्या वेबसाईटवरून सॅटेलाईटद्वारे घेतलेले फोटो प्रदर्शित करून सार्या जगाचे दर्शन घरबसल्या घेण्याची सोय उपलब्ध करून दिली. पुस्तक वाचण्यासाठी आता ग्रंथालयात जाण्याची गरज नाही ते आपण नेटवरून वाचू शकतो. आता कोणत्याही ठिकाणच्या रस्त्यावरून हिंडण्याचा, दुकानात खरेदी करण्याचा वा कार्यक्रमात प्रत्यक्ष भाग घेण्याचा अनुभव आपण एका जागी बसून घेऊ शकतो. जगातील सर्व घटना टीव्ही व इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला लगेच पाहता येतात. माहिती तंत्रज्ञानात अशा अनेक सुविधा निर्माण होत आहेत.

इंटरनेटच्या वाढत्या प्रसाराबरोबर अनेक परदेशी कंपन्या वेबसाईटच्या माध्यमातून येथील बाजारपेठ काबीज करीत आहेत. जागतिकीकरणाच्या या लाटेचा चीन, सिंगापूर, कोरिया या देशांनी फायदा घेतला असून आपला माल येथील ग्राहकांना विकण्यात ते यशस्वी झाले आहेत व त्याचा येथील उद्योगांवर विपरीत परिणाम होत आहे.सध्याच्या युगात संगणकाचा वापर प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत आहे.बँका, व्यावसायिक संस्था व उद्योग यांना आपले सर्व व्यवहार संगणकाद्वारे करण्यासाठी आतापर्यंत अनेक संगणक त्याचे नेटवर्किंग व अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर विकत घेऊन त्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक होते. आता क्लाऊड कॉम्प्युटिंगद्वारे हार्डवेअर व सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन या दोहोंचा वापर इंटरनेटवरून भाडेतत्वावर करण्याची सोय उपलब्ध  झाली आहे. यामुळे नजिकच्या भविष्यकाळात  संगणक वापराच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होणार आहे.

इंटरनेटचे धोके ओळखा.
बर्याच वेळा आपल्याला बक्षिस वा लॉटरी लागल्याच्या इ मेल येतात. काही वेळा मोठी रक्कम असलेला आपल्या नावाचा चेकही स्कॅन करून पाठविलेला असतो. इ मेल पाठविणार्या कंपनीचे नाव प्रसिद्ध कम्पनीच्या नावाशी मिळतेजुळते असते. त्यामुळे खोटेपणाबद्दल शंका येत नाही. फुकट पैसे मिळणार या कल्पनेने अनेक नवखे वा अनभिज्ञ लोक आपली माहिती ( फोटो, पासवर्ड, क्रेडिट कार्ड नंबर) पाठवितात. नंतर त्याना आपण फसविले गेलो असल्याचे समजते. आपल्या बॅंकेच्या खात्यातून परस्पर पैसे काढले जातात. आपल्या नावावर ऑन लाईन वा दुकानात खरेदी केली जाते. एकदा पैसे गेल्यावर मग काहीच करता येत नाही. कारण इ मेल पाठविणारा गायब होतो. इ मेल पाठविणारी कंपनी अस्तित्वातच नाही हे कळते.

आपल्या मित्राची वा नातेवाईकाची संकटात अडकलेल्याची व मनी ट्रॅन्स्फर एजन्सीद्वारा ताबडतोब पैसे पाठविण्याची मेल आली की आपण गोंधळून जातो. काही वेळा भावनेच्या भरात पैसे पाठवितो. नंतर कळते की त्या मित्राची मेल खोटी होती. कोणीतरी मित्राच्या इमेलचा पासवर्ड मिळवून त्यावरून खोती मेल पाठविलेली असते. अशावेळी त्या मित्राशी फोनवर संपर्क साधावा किंवा त्याच्या दुसर्या इमेलवर त्याला मेल आल्याचे कळवावे व खात्री करून घ्यावी.

वरील सर्व प्रकारच्या धोक्यांपासून सावध राहण्याची गरज आहे.

इंटरनेटवर ब्लॉग
इंटरनेटवर आपण आपली मते, लेख, फोटो प्रसिद्ध करण्यासाठी ब्लॉग लिहू शकता. रेडिफ, मनोगत, उपक्रम, इसकाळ, महाराष्ट्र टाईम्स इत्यादी अनेक वेबसाईटवर मराठीत मोफत ब्लॉग प्रसिद्ध करण्याची सोय करण्यात आली आहे. ब्लॉगर डॉट कॉम(www.blogger.com) या गुगलच्या वेबसाईटवर आपल्याला आपला जीमेलचा युजरनेम, पासवर्ड वापरून स्वतःची ब्लॉग वेबसाईट सुरू करता येते.

युनिकोड अक्षरसंच वापरून संगणकावर मराठी मजकूर लिहिणे सोपे झाल्याने आज इंटरनेटवर फार मोठ्या प्रमाणावर लोक आपले विचार मराठीतून व्यक्त करू लागले आहेत. निश्चित योजना व योग्य व्यासपीठ मिळाले तर केवळ अभिप्राय, गप्पा वा चर्चा एवढ्यापुरताच याचा उपयोग न राहता त्यायोगे मराठी साहित्यात मोलाची भर पडू शकेल. आज जागतिकीकरणामुळे जाहिरात व प्रसारमाध्यमांसाठी मराठीत लेखन व भाषांतर करण्याची गरज वाढली आहे. महिला, विद्यार्थी व शिक्षकांना याद्वारे आर्थिक लाभ मिळविण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

ज्ञानदीप
ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. ह्या कंपनीची स्थापना इ. स. २००० मध्ये तर ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशन या सेवाभावी संस्थेची स्थापना २००५ मध्ये सांगली येथे करण्यात आली. माहिती तंत्रज्ञानात झालेली प्रगती सर्व लोकांपर्यंत पोचविणे, त्यासाठी मराठी माध्यमाचा वापर करून वेबसाईट तयार करणे व त्याद्वारे शिक्षण व जनजागृती करणे हे या संस्थांचे उद्दीष्ट आहे.


या संस्थांनी संयुक्तपणे शालेय शिक्षणास उपयुक्त अशा मराठी माध्यमातील अनेक वेबसाईट विकसित केल्या आहेत.

•    मायमराठी  www.mymarathi.com
•    संस्कृतदीपिका डॉट ओआरजी www.sanskritdeepika.org
•    स्कूल फॉर ऑल डॉट ओआरजी www.school4all.org
•    विज्ञान डॉट नेट  www.vidnyan.net
•    माय सांगली डॉट कॉम www.mysangli.com
•    माय कोल्हापूर डॉट नेट www.mykolhapur.net
•    ग्रीन - टेक डॉट बीझ  www.green-tech.biz
•    एनव्हीस डॉट ओआरजी www.envis.org
•    डॉ. एस. व्ही. रानडे ब्लॉगसाईट http://dnyandeep.blogspot.com
•    सौ. शुभांगी. एस. रानडे ब्लॉगसाईट http://shubhangi.dnyandeep.com

सर्व वेबसाईटसाठी वार्षिक एकत्रित सदस्यता शुल्क १००० रुपये ठेवण्यात आले असून आपण ज्ञानदीपचे सदस्य होऊन ज्ञानदीप फौंडेशनच्या कार्यात सक्रीय सहभागी व्हावे ही विनंती.

ज्ञानदीपचे सदस्य होणार्या व्यक्तींना इमेल सुरु करणे, इंतरनेटचा वापर करून माहितीचा शोध घेणे, स्वत:चा ब्लॉग सुरू करणे फेसबुक, ट्विटर तसेच मोबाईल ऍपचा वापर करण्याविषयी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येईल.